सोमवार, ३० एप्रिल, २०१२
शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२
वाडा आठवणींचा (भाग-२)
आम्ही ह्या गांधी वाड्यात राहायला आलो १९६९ साली; मला हे एकदा न्ह्वे अनेकदा ऐकविण्यात आलंय. जसं जसा मी मोठा होत गेलो, तसं तसं वेळोवेळी शेजाऱ्यां कडून ऐकलंय "मधूची आई, मधु केवढा मोठ्ठा (म्हणजे मोटा न्हवे!!!) झाला... नाही? दोन महिन्यांचा होता इथे आलात तेव्हा". आम्ही चार भावंडं विजय (अण्णा), सुनंदा (मोठी ताई ), सुषमा (छोटी ताई) आणि मी शेंडेफळ. माझं नाव मधुसूदन पण वाडा आणि ओळखीचे डोबिवलीकर ह्यांच्या साठी मी मधुच, आणि आमची आई "मधुची आई"; थोडी अतिशयोक्ती केली तर, साने गुरुजींच्या श्याम नंतर मधुच! आणि श्यामच्या आई नंतर मधूची आईच!!
वाड्यात सगळ्या भाडेकरूंना दोन दोन खोल्या आणि तिन्ही घरांना मिळून मोठ्ठा ओटा. आम्ही राहायचो तळमजल्यावरच्या एक नंबरच्या घरात. मी म्हणे, बालपणी कधी रांगलोच नाही, एकदम बसायलाच लागलो आणि चालाण्याआधी फिरायचो कसा माहीत आहे? बसून मांडी घालायची, दोन्ही हात खांद्याच्या पातळीत सरळ पुढे धरायचे आणि मग असेच मांडी घातलेल्या अवस्थेत पुढे पुढे सरकायचे. हे उपद्व्याप बघण्यासाठी सारे शेजारी माझ्या मागे. ते सांगतात, मी असा वेगाने ओटाभर फिरायचो आणि पार्श्वभाग सोलून निघायचा. आम्ही सगळीच भावंडे लहानपणापासून तब्ब्येत राखून, त्यामुळे वाड्यातल्या सगळ्यांना भारी कौतुक, जो तो यायचा आणि घरी खेळायला न्यायचा.
आमच्या या दोन खोल्यांच्या घरात आम्ही चार भावंडं, आई, वडील, आणि आजी असे सातजण राहायचो. आत्ता विचार केला तर वाटत, कसे राहायचो आपण? आणि बरं जागा लहान पडते असं कधीच जाणवले नाही. अर्थात तेव्हा आम्ही लहानही होतो म्हणा, पण तळमजल्यावरचे घर, सगळेजण बोलके (जरा जास्तच माणसाळलेले), उत्साही, आई आणि बहिणींना विविध छंद , सगळ्या बिऱ्हाडांच्या किल्ल्या, घरी नसलेल्यांचे किराणा सामान / ग्यॅस सिलिंडर ह्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. त्यावेळी प्रायव्हसी, मुलांचा अभ्यास ह्याचे अवडंबर नव्हते. आमचे वडील एका जर्मन कंपनीत नोकरीला होते. त्यांना शिफ्ट असायच्या आणि उरलेल्या वेळेत ते प्लंबिंगचा व्यवसाय करायचे. त्यामुळे सगळ्यांना मुक्तांगण, त्यांच्या दुपारच्या आणि रात्र पाळीला रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे.
अहो पूर्वी वाडासंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली नव्हती, तेव्हा किती सोशल लाईफ होतं बघा, वाड्यात कोणीही, कधीही, कुणाहीकडे जायचं. मदतीसाठी किंवा कामासाठीच नाही हं! अगदी सहज, “काय चाललंय? जेवण झालं का? येता का जरा बाहेर? जरा दोन कांदे द्या हो”, इतक्या सहजपणे. वेळप्रसंगी मदत तर आपोआप यायची.. ती मागावी लागायची नाही. मुलांना शिस्त लावणे, रीतीभाती शिकवणे, कौतुक करणे वेळप्रसंगी ओरडणे, पाठीत धपाटा घालणे हे त्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता शेजारच्यांकडून नकळत व्हायचे. गंमत होती की नाही? घरी गोड धोड केलं की वाटीभरून शेजारी दिल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नसे. वाड्यात कुणाकडचेही कार्य म्हणजे वाड्याचेच व्हायचे. शेजारचे काका, काकू, मामा, मामी अगदी सहजपणे, ‘’मधु जरा दुकानातून काडेपेटी आणून देना, पोस्टातून चार कार्ड आणणं. कधीही कुणाचेही काम करतांना; आपण ह्यांची कामं का करायची? हे आपल्यालाच का सांगतात? असा प्रश्न आम्हा भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मनाला कधीही शिवला नाही. सगळेचजण एकमेकांना अशी मदत करायचे. असे आपण हल्ली करु शकतो का? मुलांना काही कळण्याआधीच पालकांच्या मनात वरचे दहा प्रश्न येतात आणि मग मुलं कित्येक अनुभवांपासून वंचित राहतात.
मला आठवतंय आम्ही मुलं काकवा, मावश्यांना उडदाच्या पापडांचे पीठ खलबत्यात कुटून द्यायचो आणि लाट्या हक्कानं खायचो, कुणाहीकडे कुरडया केल्या की चिक खायला जायचो, बदल्यात कुरड्या, चिकवड्या, बटाट्याचा खीस ह्या वाळवणांची राखणं करायचो. वाड्यातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून सगळ्यांना वाटायचो.
आमच्यापेक्षा मोठ्ठे म्हणजे माझा भाऊ, बहिणी, त्यांचे मित्र ह्यांनीच आम्हा मुलांना विहिरीत पोहायला शिकवलं. शिकवणं म्हणजे, अक्षरशः घाबरून पळणाऱ्या मुलांना उचलायचे आणि तसेच रडत ओरडत असतांना विहिरीत फेकून द्यायचे, खाली बाकीचे तयारच असायचे. असे आम्ही पोहायला, सायकल चालवायला कधी शिकलो कळलंच नाही. हो! आणि हे सगळे करण्यावर पालकांचाही आक्षेप नसायचा हे विशेष.
अशा या आमच्या वाड्यात सगळे सण साजरे व्हायचे, म्हणजे होळी, धुळवड, गणपती, दसरा, दिवाळी वगैरे. आमच्या मालकांकडचा गणपती हे सर्व डोंबिवलीकरांचे मोठे आकर्षण होते. त्यांचा एक मुलगा जे जे कला महाविद्यालयाचा कलाकार आहे, ते मोठ्ठी आरास करायचे. त्यांनी केलेली ताज हॉटेल, हिमालय याची आरास माझ्या अजूनही स्मरणात आहे. आरास बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची आणि मग रांगा लावणे, प्रसाद देणे ही कामे वाड्यातली मुलं करायची. साहजिकच अशा प्रसंगातून आम्ही बरेच काही शिकलो.
पूर्वी हल्लीसारखी, अशी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शाळा नसायची, ती सकाळचे वर्ग आणि दुपारचे वर्ग अशी दोन वेळा असायची, त्यामुळे सकाळी शाळेतून आलो की अभ्यास करून संध्याकाळी खेळण्यासाठी मोकळे आणि दुपारची शाळावाले संध्याकाळी खेळून रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करायचे. वाड्यातल्या मैदानात आम्ही भरपूर खेळायचो. कधी कधी तर लगोरी, डबाऐसपैस, आट्यापाट्या हे खेळ आम्हा मुलांच्या आयाही आमच्या बरोबर खेळायच्या, खरंच खूपच मजा यायची. छोट्या ताईला भातुकली खूप आवडायची. ती आम्हा मुलांना गोळा करायची आणि आम्ही काड्याकुडया गोळाकरून मातीच्या छोट्या चुलीवर भात करायचो, खरा खरा ! आंब्याच्या दिवसात, वाड्यातल्या झाडाचे आंबे तोडून रस करायचो, प्रत्येकाने स्वतःची ताट, वाटी आणि पोळ्या घरून आणायच्या आणि मग मस्त अंगत पंगत. खरंच आम्ही नशीबवान म्हणूनच असे बालपण मिळाले, हल्लीच्या मुलांकडे बघून वाटते ह्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नाही, की ह्यांनी काय गमावले आहे.
(क्रमशः)
वाड्यात सगळ्या भाडेकरूंना दोन दोन खोल्या आणि तिन्ही घरांना मिळून मोठ्ठा ओटा. आम्ही राहायचो तळमजल्यावरच्या एक नंबरच्या घरात. मी म्हणे, बालपणी कधी रांगलोच नाही, एकदम बसायलाच लागलो आणि चालाण्याआधी फिरायचो कसा माहीत आहे? बसून मांडी घालायची, दोन्ही हात खांद्याच्या पातळीत सरळ पुढे धरायचे आणि मग असेच मांडी घातलेल्या अवस्थेत पुढे पुढे सरकायचे. हे उपद्व्याप बघण्यासाठी सारे शेजारी माझ्या मागे. ते सांगतात, मी असा वेगाने ओटाभर फिरायचो आणि पार्श्वभाग सोलून निघायचा. आम्ही सगळीच भावंडे लहानपणापासून तब्ब्येत राखून, त्यामुळे वाड्यातल्या सगळ्यांना भारी कौतुक, जो तो यायचा आणि घरी खेळायला न्यायचा.
आमच्या या दोन खोल्यांच्या घरात आम्ही चार भावंडं, आई, वडील, आणि आजी असे सातजण राहायचो. आत्ता विचार केला तर वाटत, कसे राहायचो आपण? आणि बरं जागा लहान पडते असं कधीच जाणवले नाही. अर्थात तेव्हा आम्ही लहानही होतो म्हणा, पण तळमजल्यावरचे घर, सगळेजण बोलके (जरा जास्तच माणसाळलेले), उत्साही, आई आणि बहिणींना विविध छंद , सगळ्या बिऱ्हाडांच्या किल्ल्या, घरी नसलेल्यांचे किराणा सामान / ग्यॅस सिलिंडर ह्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. त्यावेळी प्रायव्हसी, मुलांचा अभ्यास ह्याचे अवडंबर नव्हते. आमचे वडील एका जर्मन कंपनीत नोकरीला होते. त्यांना शिफ्ट असायच्या आणि उरलेल्या वेळेत ते प्लंबिंगचा व्यवसाय करायचे. त्यामुळे सगळ्यांना मुक्तांगण, त्यांच्या दुपारच्या आणि रात्र पाळीला रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे.
अहो पूर्वी वाडासंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली नव्हती, तेव्हा किती सोशल लाईफ होतं बघा, वाड्यात कोणीही, कधीही, कुणाहीकडे जायचं. मदतीसाठी किंवा कामासाठीच नाही हं! अगदी सहज, “काय चाललंय? जेवण झालं का? येता का जरा बाहेर? जरा दोन कांदे द्या हो”, इतक्या सहजपणे. वेळप्रसंगी मदत तर आपोआप यायची.. ती मागावी लागायची नाही. मुलांना शिस्त लावणे, रीतीभाती शिकवणे, कौतुक करणे वेळप्रसंगी ओरडणे, पाठीत धपाटा घालणे हे त्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता शेजारच्यांकडून नकळत व्हायचे. गंमत होती की नाही? घरी गोड धोड केलं की वाटीभरून शेजारी दिल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नसे. वाड्यात कुणाकडचेही कार्य म्हणजे वाड्याचेच व्हायचे. शेजारचे काका, काकू, मामा, मामी अगदी सहजपणे, ‘’मधु जरा दुकानातून काडेपेटी आणून देना, पोस्टातून चार कार्ड आणणं. कधीही कुणाचेही काम करतांना; आपण ह्यांची कामं का करायची? हे आपल्यालाच का सांगतात? असा प्रश्न आम्हा भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मनाला कधीही शिवला नाही. सगळेचजण एकमेकांना अशी मदत करायचे. असे आपण हल्ली करु शकतो का? मुलांना काही कळण्याआधीच पालकांच्या मनात वरचे दहा प्रश्न येतात आणि मग मुलं कित्येक अनुभवांपासून वंचित राहतात.
मला आठवतंय आम्ही मुलं काकवा, मावश्यांना उडदाच्या पापडांचे पीठ खलबत्यात कुटून द्यायचो आणि लाट्या हक्कानं खायचो, कुणाहीकडे कुरडया केल्या की चिक खायला जायचो, बदल्यात कुरड्या, चिकवड्या, बटाट्याचा खीस ह्या वाळवणांची राखणं करायचो. वाड्यातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून सगळ्यांना वाटायचो.
आमच्यापेक्षा मोठ्ठे म्हणजे माझा भाऊ, बहिणी, त्यांचे मित्र ह्यांनीच आम्हा मुलांना विहिरीत पोहायला शिकवलं. शिकवणं म्हणजे, अक्षरशः घाबरून पळणाऱ्या मुलांना उचलायचे आणि तसेच रडत ओरडत असतांना विहिरीत फेकून द्यायचे, खाली बाकीचे तयारच असायचे. असे आम्ही पोहायला, सायकल चालवायला कधी शिकलो कळलंच नाही. हो! आणि हे सगळे करण्यावर पालकांचाही आक्षेप नसायचा हे विशेष.
अशा या आमच्या वाड्यात सगळे सण साजरे व्हायचे, म्हणजे होळी, धुळवड, गणपती, दसरा, दिवाळी वगैरे. आमच्या मालकांकडचा गणपती हे सर्व डोंबिवलीकरांचे मोठे आकर्षण होते. त्यांचा एक मुलगा जे जे कला महाविद्यालयाचा कलाकार आहे, ते मोठ्ठी आरास करायचे. त्यांनी केलेली ताज हॉटेल, हिमालय याची आरास माझ्या अजूनही स्मरणात आहे. आरास बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची आणि मग रांगा लावणे, प्रसाद देणे ही कामे वाड्यातली मुलं करायची. साहजिकच अशा प्रसंगातून आम्ही बरेच काही शिकलो.
पूर्वी हल्लीसारखी, अशी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शाळा नसायची, ती सकाळचे वर्ग आणि दुपारचे वर्ग अशी दोन वेळा असायची, त्यामुळे सकाळी शाळेतून आलो की अभ्यास करून संध्याकाळी खेळण्यासाठी मोकळे आणि दुपारची शाळावाले संध्याकाळी खेळून रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करायचे. वाड्यातल्या मैदानात आम्ही भरपूर खेळायचो. कधी कधी तर लगोरी, डबाऐसपैस, आट्यापाट्या हे खेळ आम्हा मुलांच्या आयाही आमच्या बरोबर खेळायच्या, खरंच खूपच मजा यायची. छोट्या ताईला भातुकली खूप आवडायची. ती आम्हा मुलांना गोळा करायची आणि आम्ही काड्याकुडया गोळाकरून मातीच्या छोट्या चुलीवर भात करायचो, खरा खरा ! आंब्याच्या दिवसात, वाड्यातल्या झाडाचे आंबे तोडून रस करायचो, प्रत्येकाने स्वतःची ताट, वाटी आणि पोळ्या घरून आणायच्या आणि मग मस्त अंगत पंगत. खरंच आम्ही नशीबवान म्हणूनच असे बालपण मिळाले, हल्लीच्या मुलांकडे बघून वाटते ह्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नाही, की ह्यांनी काय गमावले आहे.
(क्रमशः)
![]() |
मधुसूदन मुळीक
|
मंगळवार, २४ एप्रिल, २०१२
क्रोशे
२०११ हे वर्ष महाराष्ट्र मंडळामुळे फारच बिझी होतं. कार्यक्रमांचं आयोजन आणि execution करण्यामध्ये वर्ष कधी सुरु झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. खूप मजा आली. ह्या वर्षी नव्या कमिटीला कार्यभार सोपवल्यावर आलेलं रिकामपण अक्षरशः अंगावर यायला लागलं. वेळ कसा घालवायचा......... घालवायचा म्हणण्यापेक्षा कसा सत्कारणी लावायचा ह्याचा विचार करता करता अचानक क्रोशे विणताना मैत्रिणीला बघितलं, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा जुनं प्रेम उफाळून यावं तसं झालं. मग काय ..... घरात उरलेली लोकर आणि नेटवरून मिळालेलं डिझाईन ह्याची सांगड घालून एक टेबल रनर करायला घेतलं.
आधी छोटे छोटे चौकोन करून मग ते जोडले आणि तयार झालं हे टेबल रनर.
जयश्री अंबासकर
|
रविवार, २२ एप्रिल, २०१२
श्रीमती सुधा गुप्ता
श्रीमती सुधा गुप्ता पूर्वाश्रमीच्या पुष्पा गोविंदराव शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रात नंदूरबार येथे झाला. मुंबई ला बी.ए. पर्यंतचे शिक्षण व नंतर थोडे दिवस पोस्ट-टेलिग्राफ खात्यामधे टेलीफोन ऑपरेटर म्हणुन मुंबईतच नोकरी करून लग्नानंतर त्या कुवेत ला आल्या व परिवारासोबत कुवेतला स्थायिक झाल्या. १९७३ नंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले.
१९५९ साली स्थापन झालेल्या व साधारण १०० सदस्य असलेल्या Kuwait Ladies Association मधे त्यांनी कोषाध्यक्षा म्हणून काम सुरू केले. ह्यात महीन्यात एकदा सर्व महिला भेटत, खेळ व निरनिराळ्या स्पर्धांचे त्यात आयोजन केले जात असे. तसेच ही संस्था kidney transplant वगैरे संबंधित रोग्यांना पैशाने पण मदतीचा हातभार लावित असे.
श्रीमती गुप्ता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय (Ladies International League (LIL), ज्यात १४ देशांच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी Co-Chairperson चे पद भूषविले होते.
श्रीमती सुधा गुप्ता ह्यांचा महाराष्ट्र मंडळ कुवेत सुरू करण्यात मोलाचा वाटा आहे.
त्या तीनदा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. मंडळातील सभासदांच्या मुलांना संस्कृत व मराठी भाषचे ज्ञान असावे म्हणुन सतत प्रयत्नशील होत्या. महाराष्ट्राच्या परंपरा जपल्या जाव्यात असे त्यांचे नेहीमी सांगणे असे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अंध संस्थांना, लातूर भूकंप पीडितांना मदतीचा हातभार महाराष्ट्रमंडळाकडून लावण्यात आला होता.
१९९८ पासून त्या Indian Women’s Association च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी अडचणीत असलेल्या बऱ्याच भारतीय कामगार स्त्रियांना मदत केली होती. कधी कोणाला खाऊ घालणे तर कधी कोणा गरजवंताला भारताचे तिकीट काढण्यास मदत करणे, अपंगांना सहाय्य तर त्यांचे अविरत चालूच होते.
Indian Women’ League मधे पण त्यांनी काम केले होते.
त्याचबरोबर त्यांचा बाकी भाषीय मंडळांशी पण जवळचा संबंध होता. उपकार ह्या उत्तर प्रदेश च्या मंडळाचे पण कोषाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.
अशा मंडळांमधे त्यांना सत्यनारायण पूजा करायला बसण्याचा मान मिळाला होता.
कुवेत मधे येणाऱ्या प्रतिष्ठित भारतीय मंडळींमधे अटल बिहारी बाजपेयींना भेटणाऱ्या मंडळींमधे त्यांचा समावेश होता.
अशा ह्या प्रतिभाशाली श्रीमती सुधा गुप्ता ह्यांना १६ जानेवारी २००५ साली देवाज्ञा झाली.
त्यांना महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून विनम्र आदरांजली.
१९५९ साली स्थापन झालेल्या व साधारण १०० सदस्य असलेल्या Kuwait Ladies Association मधे त्यांनी कोषाध्यक्षा म्हणून काम सुरू केले. ह्यात महीन्यात एकदा सर्व महिला भेटत, खेळ व निरनिराळ्या स्पर्धांचे त्यात आयोजन केले जात असे. तसेच ही संस्था kidney transplant वगैरे संबंधित रोग्यांना पैशाने पण मदतीचा हातभार लावित असे.
श्रीमती गुप्ता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय (Ladies International League (LIL), ज्यात १४ देशांच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी Co-Chairperson चे पद भूषविले होते.
श्रीमती सुधा गुप्ता ह्यांचा महाराष्ट्र मंडळ कुवेत सुरू करण्यात मोलाचा वाटा आहे.
त्या तीनदा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. मंडळातील सभासदांच्या मुलांना संस्कृत व मराठी भाषचे ज्ञान असावे म्हणुन सतत प्रयत्नशील होत्या. महाराष्ट्राच्या परंपरा जपल्या जाव्यात असे त्यांचे नेहीमी सांगणे असे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अंध संस्थांना, लातूर भूकंप पीडितांना मदतीचा हातभार महाराष्ट्रमंडळाकडून लावण्यात आला होता.
१९९८ पासून त्या Indian Women’s Association च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी अडचणीत असलेल्या बऱ्याच भारतीय कामगार स्त्रियांना मदत केली होती. कधी कोणाला खाऊ घालणे तर कधी कोणा गरजवंताला भारताचे तिकीट काढण्यास मदत करणे, अपंगांना सहाय्य तर त्यांचे अविरत चालूच होते.
Indian Women’ League मधे पण त्यांनी काम केले होते.
त्याचबरोबर त्यांचा बाकी भाषीय मंडळांशी पण जवळचा संबंध होता. उपकार ह्या उत्तर प्रदेश च्या मंडळाचे पण कोषाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.
अशा मंडळांमधे त्यांना सत्यनारायण पूजा करायला बसण्याचा मान मिळाला होता.
कुवेत मधे येणाऱ्या प्रतिष्ठित भारतीय मंडळींमधे अटल बिहारी बाजपेयींना भेटणाऱ्या मंडळींमधे त्यांचा समावेश होता.
अशा ह्या प्रतिभाशाली श्रीमती सुधा गुप्ता ह्यांना १६ जानेवारी २००५ साली देवाज्ञा झाली.
त्यांना महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून विनम्र आदरांजली.
(शब्दांकन दीपिका जोशी)
![]() |
श्रीमती सुधा गुप्ता
|
![]() |
श्रीमती सुधा गुप्ता
|
![]() |
श्री रामचंद्र गुप्ता
|
शुक्रवार, २० एप्रिल, २०१२
वाडा आठवणींचा (भाग पहिला)
नमस्कार, महाराष्ट्र मंडळ कुवेतचा प्रतिभाकुंज हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम, ह्यामुळे अनेक चित्रकार, कवी, लेखक प्रकाशमान झाले. माझा ह्यात लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. मंडळी कुवेतमध्ये नवरे लोकांना रोजची दोन मुख्य कामे असतात. एक म्हणजे रोजीरोटी साठी जाणे आणि दुसरे घरी आले कि मुलं आणि बायको ह्यांची अनुक्रमे विविध शिकवण्या वर्ग / वाढदिवस / ममंकुच्या कार्यक्रमांचा सराव, सौंदर्य प्रसाधनगृह / किटी पार्टी ह्यांना ने-आण करणे. ह्यातून माझीही सुटका नाही, त्यामुळे मनात असूनही लिखाणास जरा वेळच झाला. माझी इच्छा आहे 'वाडा आठवणींचा' हे साप्ताहिक सदर द्यायची, त्यासाठी मी माझी पत्नी सौ. गीता हिची मदत घेणार आहे (आणि तसे तिने सध्यातरी कबूल केले आहे) मी हस्तलिखित देणार आणि ती त्याचे शुद्धलेखन, टंकलेखन करून प्रतिभाकुंजला पाठविणार. बघूया आपला उत्साह.
(माझा लिहायचा, सौ चा टंकलेखनाचा आणि तुमचा वाचण्याचा) कितीसा टिकतोय?
वाडा आठवणींचा (भाग पहिला)
आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, अगदी हृदयात कोरला गेलेला काळ असतो, तो बालपणीचा. तो कसाही असो, कितीही सुखात, दुखात पण तो काळ अगदी स्वच्छ आठवतो. आणि जसे जसे वय वाढते तसा-तसा त्याबद्दलचा जिव्हाळा आणखीच वाढत जातो. हाच काळ मला घट्ट धरून ठेवायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करतो आहे त्याला शब्दात पकडण्याचा. बघा तुम्हीही जरा...भूतकाळात गेलात, आणि आठवले ना बालपण? आपले जुने घर, शेजारी, शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक, तुमची खेळणी? आणि तुमच्या एक लक्षात आलंय का? कि आपल्याला सुरवातीचे म्हणजे इयत्ता पहिली ते साधारण चौथी पाचवी ह्यावेळचे मित्र, वर्गशिक्षक ह्यांची नावे, चेहेरे खूप चांगले लक्षात आहेत आणि तेच जास्त जवळचे वाटतात पण तसे महाविद्यालय आणि त्यापुढचे नाहीत. म्हणूनच हा वाडा आठवणींचा. माझे सगळे बालपण ह्या वाड्यातच गेलं. डोंबिवली पूर्वेला प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ असलेला गांधी वाडा. तेव्हा डोंबिवली खूप छान होती. गर्दी रहदारी इमारती सगळेच कमी होते. वाड्यासमोर एक मोठी बाग होती आणि बागेला लागून रेल्वे लाईन. आमचा वाडा म्हणजे एका मजल्यावर तीन अशी तीन मजली बिल्डींग, मालकांचा बंगला, बंगल्यात तळमजल्यावर तीन भाडेकरू आणि बंगल्याच्या जिन्याखाली एक ब्रम्हचारी भाडेकरू, मोठ्ठं मैदान आणि एकाबाजूला चौकोनी विहीर. मोठ्ठं मैदान असल्याने आमचा वाडा हा आजूबाजूच्या मुलांचा खेळाचा अड्डाच होता. विहीरही साग्रसंगीत होती बरं का! दोन बाजूला रहाट, कपडे धुवायचा मोठ्ठा दगड, मोरी, त्यावर सिमेंट चा पत्रा आणि कडेला शौचालय. मालकांच्या बंगल्याला पहिल्या मजल्यावर छोटी बाल्कनी होती, त्यावरचा रहाट बरोबर यायचा विहिरीवर. वाड्यात गुलमोहर, रातराणी, पांढरा आणि हिरवा चाफा, बकुळ, तगर, अनंत, प्राजक्त, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, जाम,शेवगा इतकी सगळी झाडं. मालकांची (गांधी आडनांव नावापुरतेच, अजूनही त्यांचा उल्लेख मालक म्हणूनच) छोटी आणि तळमजल्यावरच्या बिराडांच्या स्वतःच्या छोट्या छोट्या बागा. हे सगळे इतके तपशीलवार ह्यासाठी कि पुढे पुढे हे सगळे येणार आहेत आपल्या भेटीला. तर मंडळी आज ह्या वाड्याबद्दलच, आपण पुढेपुढे भेटणार आहोत ह्या वाड्यातील माझ्या बालपणाला आणि एकेका शेजाऱ्याला.
मला हे लिहिताना खरच माझ्या बालपणात आणि वाड्यात गेल्यासारखं वाटतंय. अहो किती लहान झालो, मी ह्या प्रस्तावनेतच. तुम्हीही वाचा आणि जा हरवून तुमच्या बालपणात.
क्रमशः
(माझा लिहायचा, सौ चा टंकलेखनाचा आणि तुमचा वाचण्याचा) कितीसा टिकतोय?
वाडा आठवणींचा (भाग पहिला)
आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, अगदी हृदयात कोरला गेलेला काळ असतो, तो बालपणीचा. तो कसाही असो, कितीही सुखात, दुखात पण तो काळ अगदी स्वच्छ आठवतो. आणि जसे जसे वय वाढते तसा-तसा त्याबद्दलचा जिव्हाळा आणखीच वाढत जातो. हाच काळ मला घट्ट धरून ठेवायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करतो आहे त्याला शब्दात पकडण्याचा. बघा तुम्हीही जरा...भूतकाळात गेलात, आणि आठवले ना बालपण? आपले जुने घर, शेजारी, शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक, तुमची खेळणी? आणि तुमच्या एक लक्षात आलंय का? कि आपल्याला सुरवातीचे म्हणजे इयत्ता पहिली ते साधारण चौथी पाचवी ह्यावेळचे मित्र, वर्गशिक्षक ह्यांची नावे, चेहेरे खूप चांगले लक्षात आहेत आणि तेच जास्त जवळचे वाटतात पण तसे महाविद्यालय आणि त्यापुढचे नाहीत. म्हणूनच हा वाडा आठवणींचा. माझे सगळे बालपण ह्या वाड्यातच गेलं. डोंबिवली पूर्वेला प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ असलेला गांधी वाडा. तेव्हा डोंबिवली खूप छान होती. गर्दी रहदारी इमारती सगळेच कमी होते. वाड्यासमोर एक मोठी बाग होती आणि बागेला लागून रेल्वे लाईन. आमचा वाडा म्हणजे एका मजल्यावर तीन अशी तीन मजली बिल्डींग, मालकांचा बंगला, बंगल्यात तळमजल्यावर तीन भाडेकरू आणि बंगल्याच्या जिन्याखाली एक ब्रम्हचारी भाडेकरू, मोठ्ठं मैदान आणि एकाबाजूला चौकोनी विहीर. मोठ्ठं मैदान असल्याने आमचा वाडा हा आजूबाजूच्या मुलांचा खेळाचा अड्डाच होता. विहीरही साग्रसंगीत होती बरं का! दोन बाजूला रहाट, कपडे धुवायचा मोठ्ठा दगड, मोरी, त्यावर सिमेंट चा पत्रा आणि कडेला शौचालय. मालकांच्या बंगल्याला पहिल्या मजल्यावर छोटी बाल्कनी होती, त्यावरचा रहाट बरोबर यायचा विहिरीवर. वाड्यात गुलमोहर, रातराणी, पांढरा आणि हिरवा चाफा, बकुळ, तगर, अनंत, प्राजक्त, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, जाम,शेवगा इतकी सगळी झाडं. मालकांची (गांधी आडनांव नावापुरतेच, अजूनही त्यांचा उल्लेख मालक म्हणूनच) छोटी आणि तळमजल्यावरच्या बिराडांच्या स्वतःच्या छोट्या छोट्या बागा. हे सगळे इतके तपशीलवार ह्यासाठी कि पुढे पुढे हे सगळे येणार आहेत आपल्या भेटीला. तर मंडळी आज ह्या वाड्याबद्दलच, आपण पुढेपुढे भेटणार आहोत ह्या वाड्यातील माझ्या बालपणाला आणि एकेका शेजाऱ्याला.
मला हे लिहिताना खरच माझ्या बालपणात आणि वाड्यात गेल्यासारखं वाटतंय. अहो किती लहान झालो, मी ह्या प्रस्तावनेतच. तुम्हीही वाचा आणि जा हरवून तुमच्या बालपणात.
क्रमशः
![]() |
| मधुसूदन मुळीक |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




