रविवार, २७ मार्च, २०११

त्सुनामी वाळूची

अकस्मात आकाशी धुराचे लोळ
सार्‍यांच्या मनी उठला हल्लकल्लोळ
रिफायनरीतल्या आगीचे का असतील लोळ
का कुठे स्फोटाने झाली असेल जाळपोळ

मिट्ट झाला काळोख चोहीकडे
बंद घरातही जीव घुसमटे
भरीला सोसाट्याने वाहू लागला वारा
चढू लागला सार्‍यांच्या अस्वस्थतेचा पारा

काहींना वाटले, ही शेवटची घंटा
यमराजाचं फर्मान, ’मला येऊन भेटा’
मायदेशी केले दूरध्वनीवर संभाषण
अखेरच्या निरोपाचा येऊन ठेपला क्षण

कुवेतमधले नेटवर्क होऊन गेले जाम
जीवलगांचा आता कसा शोधावा माग
काळजीने जीवाने सोडला अगदी थांग
ठप्प झाली रस्त्यात गाड्यांची रांग

शेजारी पाजारी केला विचारविमर्ष
वाळूच्या वादळाचाच निघाला निष्कर्ष
’२०१२’ तल्या दृष्यांचे आभास झाले सदृष्य
जीवलग परतून येता मनी दाटला हर्ष

नेटवर कळले ही तर वाळूची त्सुनामी
मिळू लागली पुन्हा आयुष्याची हमी
चित्रगुप्ताचे अद्याप चालू आहे अधिक उणे
उर्वरीत आयुष्याचे सार्‍यांनी करावे सोने










अर्चना देशमुख

२ टिप्पण्या: